आषाढ
- रणजित देसाई
अठरा ग्रामीण कथांचा संग्रह. वैशाख, आषाढ, मेघ यांसारख्या ऋतूंवर अन् माणसांच्या जीवनावर आधारित कथा. लेखकाची सिद्धहस्त लेखणी. माणसातल्या भावभावनांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारं पुस्तक.
खरंतर रडक्या कथांचा संग्रह, असं म्हणायला हरकत नाही. कारण यातल्या कमाल कथांचा शेवट हा दुःखदच लिहिलाय. पण आयुष्यात सगळ्यांच गोष्टींचा शेवट सुखद थोडीच होतो, हे ही खरंच.
कथेची सुरुवात मात्र वातावरण निर्मिती करणारी. काल एका दिवसात संपवलं.
परवा रवी काळे सरांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या पस्तीस पुस्तकांमधली मी न वाचलेली पाच पुस्तकं उचलून आणली. त्यातलंच हे एक!
त्याबद्दल काळे सरांचे आभार!
पाडी कथा खूप आवडली.
दोन टवाळ पोरं नदीवर पाणी भरणाऱ्या एका सुंदर स्त्रीची शिटी वाजवून दोन-चार वेळा टर उडवतात. रागाने बघत ती काहीही न बोलता पैलवान नवऱ्याला नदीवर घेऊन येते. नवऱ्याला नदीत साप असल्याचे सांगते, तो नदीतला भला मोठा दगड सहजगत्या उचलतो, साप नाही म्हणत निघून जातो. दोघांची बोबडी वळलेली पाहून गालातल्या गालात हसते. दोघांची वाचा बंद असल्याचे पाहून स्त्री दोघांना म्हणते,
"बाबांनो भिऊ नगासा, ह्यांच्या कानावर म्या घातलं असतं तर बोलायला जिता राहिला नसता तुम्ही. देवानं मला जसं रुप दिलं तसाच सूर्यावाणी नवरा दिलाय. मला तुमचं बोलणं वाईट लागलं न्हाई, पण गमतीला बी मर्यादा असते."
भल्या मोठ्या संकटातून वाचल्याचे लक्षात येताच दोघांनी गपकन हात जोडले.
😍💐

No comments:
Post a Comment