अनुबंध
शांतस्वरूपिणी शांता शेळके
अनुबंध
शांतस्वरुपिणी शांता शेळके
१४भावनिक कथांचा संग्रह.
छोट्या रानफुलांसारख्या निर्मितीच्या पाऊलखूणा उमटवत, फुलवत कथा आभाळाला स्पर्श करू पाहतात आणि वाचनात आपण कधी गुंग होऊन जातो, कळतही नाही.
साहित्य संमेलनाच्या आळंदीच्या अध्यक्षा शांताबाई संमेलन झाल्यावर अरुणाताई ढेरेंसोबत बांगड्या भरून आनंद साजरा करतात, एवढं साधंपण! मनाची श्रीमंती! त्यांनी भरभरून भाषेवर प्रेम केलं, याची प्रचिती कथा वाचताना येते.
शांताबाई नाव उच्चारलं की त्यांचं काव्य आठवतं...
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी,
मजफुल ही रुतावे,हा दैवयोग आहे!
लोकांच्या संबंधांबद्दल खुमासदार चर्चा करणारी रजनीताई पद्मनाभ आणि शोभा यांच्याविषयी चर्चा करते. पद्मनाभ लालबुंद होत, "आम्ही प्रेम करतो, तुम्हीही करून बघा कोणावर. पण छे! ते शक्य नाही,तुमच्या बाबतीत. तुम्ही अशाच रजुताईच राहणार, अगदी मरेपर्यंत."
प्रेम प्रेमिकांच्या प्रेमसंबंधातली कोणत्यावेळी केलेली कोणती ढवळाढवळ तिला भोवली, त्यातल्या कुणाचा तळतळाट तिला बाधला की ती आजन्म प्रेमापासून पारखी राहिली! या आशयाची 'कोडे' कथा काळजाला स्पर्शून जाते.
पुस्तक मिळवून नक्की वाचा.
😍

No comments:
Post a Comment